Loading...
ब्रेकिंग न्यूज :
लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू निरागस मने पुस्तकासाठी मीना म्हसे-आसने सन्मानित
New Delhi,India

'टीईटीग्रस्त' शिक्षकांना केंद्राचा दिलासा

सरकारच्या पावलांनी लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवित
'टीईटीग्रस्त' शिक्षकांना केंद्राचा दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर देशभरातील लाखो प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून शाळांमध्ये शिकवत असलेले, मात्र टीईटी उत्तीर्ण न झालेले शिक्षक सध्या प्रचंड तणावाखाली आहेत.
एकीकडे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी परीक्षेची तयारी, अशा दुहेरी कात्रीत हे शिक्षक सापडले आहेत.
टीईटी सक्तीला सूट द्यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सेवेत असलेले शिक्षक, विविध शिक्षक संघटना आणि काही लोकप्रतिनिधी केंद्र सरकारकडे सातत्याने निवेदने देत होते. अनेक ठिकाणी आंदोलन, धरणे आणि निदर्शनेही झाली. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने सर्व राज्य सरकारांकडून 2011 पूर्वी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नियुक्त झालेल्या शिक्षकांची सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती 16 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 डिसेंबर रोजीच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या या हालचालीमुळे देशातील सुमारे 12 लाख शिक्षकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणते शिक्षक प्रभावित होऊ शकतात, याचा अचूक तपशील राज्य सरकारांकडून मागवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातच सुमारे 1.86 लाख शिक्षक असे आहेत, ज्यांनी अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षक, त्यांची शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण, तसेच वयोगटानुसार सविस्तर वर्गीकरणाची माहिती मागितली आहे. 21 ते 25, 26 ते 30, 31 ते 35, 36 ते 40, 41 ते 45, 46 ते 50, 51 ते 55, 56 ते 60 आणि 60 वर्षांवरील शिक्षकांची स्वतंत्र माहिती द्यावी लागणार आहे.
याशिवाय केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाचे प्रश्नही विचारले आहेत. 2011 मध्ये एनसीटीईने जारी केलेल्या अधिसूचनेपूर्वी किती शिक्षकांची नियुक्ती झाली, 2011 नंतर किती नियुक्त्या झाल्या, तसेच 2011 पूर्वीच सीटीईटी किंवा टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची संख्या किती, याचा तपशील द्यावा लागणार आहे.
या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर किंवा धोरणात्मक पातळीवर कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात, याबाबत राज्य सरकारांनी आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असेही केंद्राने सांगितले आहे.
दरम्यान, 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत यंदा वेगळे चित्र दिसणार आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीही टीईटी अनिवार्य झाल्याने यावेळी विक्रमी 25 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.
विविध राज्यांमध्ये या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येत असून, उत्तर प्रदेशात 1.86 लाख, राजस्थानात सुमारे 80 हजार, मध्य प्रदेशात सुमारे 3 लाख तर झारखंडमध्ये हजारो शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे देशभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.