New Delhi,Maharashtra,India
आता UPI ने 10,000 रुपये ट्रान्सफर करता येणार नाहीत
एक तास थांबावे लागणार

नवी दिल्ली : नवीन लाभार्थी (new beneficiary) यांना पैसे पाठवताना फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आरबीआय ने एक निर्णय घेतलाआहे. सध्या सगळं यूग हे डिजीटल गोष्टींचा वापर करत आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त वापर हा कॅश ऐवजी ऑनलाइन पेमेंटचा केला जातो. १ रुपयाच्या चॉकलेटचे बील सुद्धा ऑनलाइन पद्धतीने होऊ शकतं. पण आता तुम्हाला १०,००० पेक्षा जास्त रक्कम पेमेंट करण्यासाठी मध्ये १ तास थांबावे लागेल. हा नवा नियम आरबीआय एका महत्वाच्या कारणासाठी लागू केला आहे.
सगळेच ऑनलाइन पेमेंट करतात. पण आता त्यामध्ये बऱ्याच फसवणुकींना सामोरं जावं लागतं. यामुळे लोकांना डिजीटल पेमेंट करणं सोयीचं वाटत नाही. यालाच आळा घालण्यासाठी आणि Authorised Push Payment (APP) फ्रॉड थांबवण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल व्यवहार जास्त सुरक्षित करण्यासाठी या बॅंकेने १०,००० पेक्षा जास्त रकमेच्या ट्रान्झॅक्शनवर नवीन सुरक्षा नियम सुचवले आहेत. जे पुढील प्रमाणे आहेत. यामुळे सगळ्यात UPI युजर्सना फायदा होणार आहे.
जर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम एखाद्या नवीन व्यक्तीच्या युपीआय अकाउंटवर पाठवत असाल तर, त्या व्यवहारावर एक तासाचा होल्ड लागू शकतो. म्हणजेच, पैसे ताबडतोब ट्रान्सफर होणार नाहीत. ट्रान्सफर होण्याआधी एक तास तुम्हाला वाट पाहावी लागेल. तुम्ही या वेळेत तुमचा व्यवहार रद्द सुद्धा करु शकता. APP फ्रॉड थांबवण्यासाठी तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होणार आहे.
रिजर्व बँकेचा हा प्रस्ताव लागू झाल्यावर डिजिटल व्यवहार करताना थोडा वेळ जास्त लागेल, पण त्याचबरोबर तुमचे पैसे जास्त सुरक्षित राहतील. त्यामुळे घाईत व्यवहार करण्याऐवजी सतर्क राहणं जास्त गरजेचं ठरेल.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.