Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
New Delhi,India

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी १० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. ती न्यायालयाने दिली आहे.

प्रशासकीय कारणांमुळे मुदतवाढीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याची मुदत निश्चित केली होती. मात्र, प्रशासकीय अडचणींचे कारण देत निवडणूक आयोगाने आता १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

आरक्षणाचा तिढा आणि न्यायालयाचे आदेश

ओबीसी आरक्षणाच्या २७ टक्के मर्यादेवरून उद्भवलेल्या वादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच घेतल्या जाव्यात. ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ५० टक्के मर्यादेचे पालन करतात, तिथेच निवडणुका घेतल्या जाव्यात. या नियमानुसार, आयोगाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली होती.


विदर्भ आणि मराठवाड्यातील पेच

निवडणूक आयोगाला पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया राबवताना यश आले असले तरी, राज्यातील एकूण ३२ पैकी २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के मर्यादेचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत तिथे निवडणुका न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

निवडणुका लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे:

१. एकाच वेळी निवडणुकांची मागणी: सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 २. ईव्हीएम (EVM) टंचाई: महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यात ईव्हीएम मशीनचा तुटवडा असल्याचे समजते. 

३. बोर्डाच्या परीक्षा: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आहेत. या काळात शिक्षक आणि सरकारी यंत्रणा परीक्षेच्या कामात व्यस्त असते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.