Loading...
ब्रेकिंग न्यूज :
नवलाई आली नवलाई आली मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारा सुसंस्कारक्षम कथासंग्रह - साद निसर्गाची शिक्षकांच्या संवेदनशीलतेची नवी दिशा अमरावतीत १४ गट शिक्षणाधिकाऱ्यांना 'सीईओं' ची कारणे दाखवा नोटीस वाकी मराठी शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनमुलवाड यांना साहित्यरत्न पुरस्कार आमणापूर विकास मंच चिंचवड मार्फत आमणापूर जि.प. शाळेत वह्या वाटप प्रवीण जोशींमुळे माणदेशी ओव्या साहित्यात अजरामर : महादेव जानकर ग्रीनलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना १० हजारांची मदत पर्यावरण दिनानिमित्त वनकुसवडे शाळेत वृक्षारोपण संपन्न पत्नी व मुलांची हत्या करून शिक्षकाची आत्महत्या जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू आयुष्याची 'एव्हरग्रीन' नायिका पेन्शन आदर्श शिक्षिका ते लेखिका एक सुंदर प्रवास रंजना सानप भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, शिक्षक ठरले देवदूत जि. प.शाळा इसवली सुतार पनोरेच्या मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' अभिनव उपक्रम विदर्भातील शाळांची घंटा ३० जूनला वाजणार मुख्यालयी निवासस्थाने द्या, अन्यथा मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य सरचिटणीसपदी किशनराव इदगे यांची निवड शिक्षकांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेऊ : पोपटराव पवार गावाकडची जत्रा जिल्हा परिषद शाळांतील पावसाळी सुट्टी - फायदे, तोटे आणि वास्तव... अतिरिक्त पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेस स्थगिती देण्याची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी जनगणना ड्युटीवर शिक्षकांचा मृत्यू झाल्यास एक कोटी मदतीची संघटनेची मागणी प्रा. रामचंद्र यादव यांना राज्यस्तरीय छ. शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार हवेली पत्रकार व वनराई देवराई संस्थेकडून सचिन बेंडभर यांचा विशेष सत्कार सेवाजेष्ठ टीईटी शिक्षकांच्या पदोन्नतीतील समावेशासाठी पूर्ण सहकार्य : दादा भुसे युवराज कांदेकर यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय : दीपक रोकडे मनोहर आंधळे यांच्या कवितेचा चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश टीईटी रद्दसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य शिक्षक संघाची भव्य महामंडळ सभा आजचे अधिकारी, कालचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पालकांनी जि.प. शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा काट्याची फुले करून मुंढरीची पंढरी साजरी करणाऱ्या ध्येयवेड्या गुरुजींचा खडतर जीवन प्रवास जि.प. शाळांत जादा तासांची धामधूम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळांची सुरुवात आता झाडे लावण्यापासून मुंबईतील ५७ मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर मालवणी, वऱ्हाडी बोलीभाषांचा पाठ्यपुस्तकात समावेश जि.प. शाळेत प्रवेशासाठी 'वासुदेवाची' साद राळेगणसिद्धीत शिक्षकांचा एल्गार, उद्या राज्यस्तरीय महामंडळ सभा, अण्णा हजारे, पोपटराव पवार करणार मार्गदर्शन दिनेश फडतरे यांना राज्यस्तरीय साहित्य परिमल पुरस्कार जाहीर राज्य शिक्षक संघाची राळेगण सिद्धी येथे ११ जून रोजी महामंडळ सभा हा अधिक महिना येतो कुठून...? JAB WE MET -An Endearing Story telling शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा राबवा ढोरेगाव केंद्राच्या प्रमुखपदी राजेश हिवाळे यांची नियुक्ती डॉ. संजय जगताप लिखित पुस्तक 'घे भरारी' चे दिमाखदार प्रकाशन समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुंजवणे गावाची उच्चस्तरीय पाहणी जनगणना बळी थांबेनात जि.प. शिक्षकाचा मृत्यू जिल्ह्यातून शिक्षकांनी मोठ्या संख्येने राळेगणसिद्धी येथे जमावे : विनायकराव शिंदे
New Delhi,India

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी १० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. ती न्यायालयाने दिली आहे.

प्रशासकीय कारणांमुळे मुदतवाढीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याची मुदत निश्चित केली होती. मात्र, प्रशासकीय अडचणींचे कारण देत निवडणूक आयोगाने आता १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

आरक्षणाचा तिढा आणि न्यायालयाचे आदेश

ओबीसी आरक्षणाच्या २७ टक्के मर्यादेवरून उद्भवलेल्या वादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच घेतल्या जाव्यात. ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ५० टक्के मर्यादेचे पालन करतात, तिथेच निवडणुका घेतल्या जाव्यात. या नियमानुसार, आयोगाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली होती.


विदर्भ आणि मराठवाड्यातील पेच

निवडणूक आयोगाला पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया राबवताना यश आले असले तरी, राज्यातील एकूण ३२ पैकी २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के मर्यादेचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत तिथे निवडणुका न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

निवडणुका लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे:

१. एकाच वेळी निवडणुकांची मागणी: सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 २. ईव्हीएम (EVM) टंचाई: महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यात ईव्हीएम मशीनचा तुटवडा असल्याचे समजते. 

३. बोर्डाच्या परीक्षा: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आहेत. या काळात शिक्षक आणि सरकारी यंत्रणा परीक्षेच्या कामात व्यस्त असते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.