Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विदर्भातील शाळा १५ जूनलाच सुरू होणार, शिक्षक संघटनांचा विरोध राज्यात २०१७ नंतर झालेल्या शिक्षक भरतीचे होणार ऑडिट जिल्हास्तर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत स्वरांजली भोसलेचा प्रथम क्रमांक समायोजन प्रक्रियेवर शिक्षक संघ आक्रमक बोपर्डी शाळेच्या वरद जाधवची नवोदय विद्यालयासाठी निवड गुंजवणेत रंगला जिल्हा परिषद शाळांचा एकत्रित बाल आनंद मेळावा पिंपळोशी जिल्हा परिषद शाळेत 'निर्भयाने' दिले आत्मसंरक्षणाचे धडे मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल'
Satara,Maharashtra,India

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर संक्रात ?

जनगणनेच्या कामामुळे लोड वाढला
शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर संक्रात ?

पुणे : उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांना यंदा सुट्टीमध्ये जनगणनेच्या कामाला जुंपले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गुरुजींना जास्तीचं काम लागणार आहे.

त्यामुळे शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता या शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत, असे वृत्त सरकारनामाने दिले आहे.

जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कोरेकर यांनी स्वतंत्रपणे आदेश काढून जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदेश काढल्यामुळे शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणूक कामकाजात गुरफटलेल्या शिक्षकांना आपली सरकारी कामातून सुटका झाल्याचे वाटले असताना पुन्हा एकदा येऊ घातलेल्या जनगणनेच्या कामकाजाकडे त्यांना डोळ्यात तेल घालून काम करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.

१ मेनंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र जनगणनेच्या कामासाठी प्रशिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर १६ मे पासून ते १५ जूनपर्यंत जनगणनेच्या कामकाजासाठी शिक्षकांना आपले मुख्यालय सोडता येणार नाही.

बाहेर गावच्या शिक्षकांनी मूळगावी मे महिन्यात केलेल्या नियोजनावर पाणी पडणार असून, उन्हाळ्याच्या सुट्टीतील पर्यटन, देवदर्शन, लग्नकार्य आदी कार्यक्रमावर गदा येणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या कामासाठी शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहावे लागेल. त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.