Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
Nanded,Maharashtra,India

९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती?

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागवला सविस्तर प्रतिज्ञापत्र
९वी-१२वी शिक्षकांना TET सक्ती?

नांदेड : माध्यमिक स्तरावरील (इयत्ता ९ ते १२वी) विशेष शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे का? याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे.

तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतनसमता आणि सेवा अटींबाबत यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमिकस क्युरी ऋषी मल्होत्रा तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि मनीष सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित आदेश दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

इयत्ता ९ ते १२ (माध्यमिक स्तर) साठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का? १० जून २०२२ रोजी शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रातील भरती प्रक्रिया फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकेंडरी या सर्व स्तरांवर लागू होते का? २०१० नंतर केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र टीईटी परीक्षा घेतली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. सुनावणीदरम्यान एएसजी भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी, त्यात माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचाही समावेश टी ई टी अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच Rehabil-itation Council of India (RCI) चे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी २०२१ मधील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात ‘समग्र शिक्षा’ योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली होती.

अमिकस क्युरींची भूमिका

अमिकस क्युरी यांनी युक्तिवाद केला की २०२२ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांत ‘एज्युकेटर’ हा शब्द इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ साठी वापरण्यात आला आहे; मात्र ९ ते १२ साठी नाही. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते, असे त्यांनी सूचित केले. विशेषतः सेवाशेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राटी शिक्षकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.


कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्देश

हस्तक्षेपकत्यांच्या वतीने वरिष्ठ वकील वीरराधवन यांनी सांगितले की २०२२ मधील न्यायालयीन आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांच्या वेतनसमता आणि सेवा अटीबाबत अद्याप कोणत्याही राज्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारांना एका महिन्याच्या आत हलफनामा सादर करून २१ जुलै २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच मार्च २०२५ मधील आदेशातही है निर्देश पुनरुच्चारित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी केंद्र सरकारकडून हलफनामा सादर झाल्यानतर होणार आहे.

कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक

त्यामध्ये इयत्ता १ ते ५ आणि ६ ते ८ साठी टीईटी अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते; मात्र ९ ते १२ साठी तसा स्पष्ट उल्लेख नव्हता. यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, “जर मार्गदर्शक तत्त्वांत इयत्ता ९ व १० चा स्पष्ट उल्लेख नसेल, तर आता ते अनिवार्य कसे म्हणता येईल? केवळ पत्राद्वारे नियम बदलता येणार नाहीत. त्यासाठी कायद्यात किंवा नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.