Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा
Pune,Maharashtra,India

कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची मागणी
कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

 पुणे : राज्यातील सेवाज्येष्ठ व कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले.

   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेतही टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.

   राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शासकीय व निमशासकीय शिक्षकांना टीईटी/सीटीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी व विषय शिक्षक पदांवरील पदोन्नतीसाठीही ही अट लागू करण्यात आली आहे.

   सध्या अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गांसाठी उत्तीर्णतेसाठी ५ टक्के गुणांची सवलत देण्यात येते (किमान ५५% गुण आवश्यक). तर माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व कुटुंबीयांसाठी १५ टक्के सवलत देऊन किमान ४५% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

   याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना त्यांच्या वयाचा, मानसिकतेचा व अभ्यासक्रमातील बदलांचा विचार करून १५ टक्के गुणांची सवलत देण्यात यावी, म्हणजेच टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.

   या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक भूमिका घेत उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.

   या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे, अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी, शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.