Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम राज्यस्तरीय शिक्षण संवाद कार्यशाळा मुंबई येथे उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त जि.प. च्या गळनिंब शाळेत भक्तिमय बालदिंडी सांगली शिक्षक बँकेत भरतीवरुन घमासान गुरु पौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस... गुरु पौर्णिमा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव नीट परीक्षेत ६२५ गुण मिळविणाऱ्या उत्कर्ष राक्षेला लक्ष्य अकॅडमीकडून हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भेट लोकमंगल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनराईज ग्रुपकडून मोफत गणवेश वाटप झेप प्रतिष्ठानतर्फे रुईघर, शिंदेवाडी शाळांना संगणक, शैक्षणिक साहित्याचे वितरण शिरगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश श्री भवानी बालविद्या मंदिराची उत्साहपूर्ण आषाढी बालदिंडी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हेकळवाडी शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी टाके वस्ती शाळेच्या दिंडीतून पर्यावरण, सामाजिक जनजागृती वाई तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शाळांनाही २० पटासाठी तीन शिक्षक मंजूर व्हावेत भक्तिरसात न्हाऊन निघाले रांजणगाव पोळ कानेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संगमनेर नगरपालिका शाळा क्र. ८ मध्ये भारतीय भाषा शिबिराचा उत्साहात समारोप
Pune,Maharashtra,India

कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची मागणी
कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

 पुणे : राज्यातील सेवाज्येष्ठ व कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले.

   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेतही टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.

   राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शासकीय व निमशासकीय शिक्षकांना टीईटी/सीटीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी व विषय शिक्षक पदांवरील पदोन्नतीसाठीही ही अट लागू करण्यात आली आहे.

   सध्या अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गांसाठी उत्तीर्णतेसाठी ५ टक्के गुणांची सवलत देण्यात येते (किमान ५५% गुण आवश्यक). तर माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व कुटुंबीयांसाठी १५ टक्के सवलत देऊन किमान ४५% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

   याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना त्यांच्या वयाचा, मानसिकतेचा व अभ्यासक्रमातील बदलांचा विचार करून १५ टक्के गुणांची सवलत देण्यात यावी, म्हणजेच टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.

   या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक भूमिका घेत उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.

   या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे, अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी, शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.