Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम राज्यस्तरीय शिक्षण संवाद कार्यशाळा मुंबई येथे उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त जि.प. च्या गळनिंब शाळेत भक्तिमय बालदिंडी सांगली शिक्षक बँकेत भरतीवरुन घमासान गुरु पौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस... गुरु पौर्णिमा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव नीट परीक्षेत ६२५ गुण मिळविणाऱ्या उत्कर्ष राक्षेला लक्ष्य अकॅडमीकडून हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भेट लोकमंगल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनराईज ग्रुपकडून मोफत गणवेश वाटप झेप प्रतिष्ठानतर्फे रुईघर, शिंदेवाडी शाळांना संगणक, शैक्षणिक साहित्याचे वितरण शिरगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश श्री भवानी बालविद्या मंदिराची उत्साहपूर्ण आषाढी बालदिंडी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हेकळवाडी शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी टाके वस्ती शाळेच्या दिंडीतून पर्यावरण, सामाजिक जनजागृती वाई तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शाळांनाही २० पटासाठी तीन शिक्षक मंजूर व्हावेत भक्तिरसात न्हाऊन निघाले रांजणगाव पोळ कानेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संगमनेर नगरपालिका शाळा क्र. ८ मध्ये भारतीय भाषा शिबिराचा उत्साहात समारोप
Akola,Maharashtra,India

पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

शिक्षण हक्क निकषाला पोहोचणार बाधा : डॉ. बोर्डे
पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

अकोला : पटसंख्येच्या निकषावरील संचमान्यतेमुळे असंख्य शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. शिक्षकाविना शाळा हे धोरण अन्यायकारक ठरत असल्याची भूमिका विज्युक्टाने मांडली आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक गरजेचे असून त्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

तुकडी निकषाऐवजी विद्यार्थी संख्येच्या आधारावर कार्यभार गणना करतांना त्यासाठीचे प्रचलित सर्व निकष व शासन आदेश अधिक्रमित करून १५ मार्च २०२४ च्या शासन आदेशात दिलेल्या पटसंखेच्या निकषानुसार संचमान्यता केली जात आहे. २००९ च्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदे भरली जात होती.

मात्र, शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशानुसार त्यात बदल झाल्याने शिक्षण हक्क कायद्यातील निकष सुद्धा बाधित होत आहेत. यामुळे अनेक शाळा एकच किंवा शुन्य शिक्षकी होतील. ४० च्याऐवजी ३९ विद्यार्थी संख्या झाल्यास शुन्य शिक्षक अशी अवस्था निर्माण होईल. ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकाविना होतील.

राज्यात मोफत शिक्षण घेणाऱ्या शहरी तथा ग्रामीण शेतकरी मुलांना शिक्षकाशिवाय शिक्षण घ्यावे लागेल. ही बाब त्यांना शिक्षणापासून वंचित करणारी असून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे, असा आरोप विज्युक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे यांनी केला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक असावेत, याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, उर्वरित वर्गाच्या परीक्षा मुल्यमापन व निकाल हे काम सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे यांना विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

परीक्षा कार्यात शिक्षक व्यस्त; समायोजन प्रक्रिया थांबवा

२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हास्तरावर समायोजनाची कार्यवाही ३ मार्चपर्यंत, तर २५ मार्चपर्यंत विभाग स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश संचालकांनी ४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात १० फेब्रुवारीपासून मंडळाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देखील सुरू आहेत. या सोबतच शिक्षकांना मंडळाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे लागेल.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.